सर्वोच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना फटकारले
एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाही त्या प्रकरणासंदर्भात `सूत्रांच्या' हवाल्याने बातम्या देणा-या प्रसारमाध्यमांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्या चौकशीवर परिणाम करेल, अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने देवून सनसनाटी निर्माण करण्यास न्यायालयाने मज्जाव केला
आहे.
आरूषी तलवार हत्या प्रकरणी न्यायालयाने आपले मत व्यक्त केले आहे. न्यायालयाने केलेली ही सूचना पत्रकारितेतील मैलाचा दगड ठरू शकेल, असे पत्रविश्वात बोलले जात आहे. ब-याचदा अर्धवट माहितीच्या आधारे गहजब माजविणा-या वृत्तवाहिन्यांसाठी न्यायालयाची ही सूचना म्हणजे महत्त्वाचा इशारा मानला जात आहे.
टाइम्स ऑफ इंडियामध्ये १० ऑगस्ट रोजी ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. ही बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
0 comments:
Post a Comment